- - - बातम्या सोबत विचार देणारे - - - - - - बातम्या सोबत विचार देणारे - - -
Tuesday, 09 March 2010

 

   वाहतुकीच्या शिस्तीचे प्रशासनापुढे मोठे आव्हान

सध्या नांदेड शहर एका मोठया संक्रमणातून जात आहे मागील चारपाच वर्षाच्या अवधीत शहरात मोठमोठी विकास कामे झाली शहराचा कायापालट झाला मधल्या काळात या बांधकामामुळे नांदेडकरांचीही चांगलीच कसरत झाली आता बहुतांश विकास कामे पूर्णत्वाला आली आहेत शहरात जिथे तिथे झालेल्या अस्ताव्यस्ततेमुळे मागील काळात वाहतुकीच्या नियमातही ढिलाई देण्यात आली होती आता प्रशासनाने शहराच्या वाहतुकीला शिस्त लावण्याचे मुख्य धोरण ऐरणीवर घेतले आहे सध्याची नांदेडची वाहतूक पाहून नांदेड शहर ही वाहतुकीच्या बाबतीत पुण्यासारखे बदनाम होते की काय? असा प्रश्न उभा राहतो अशा परिस्थितीत शहरातल्या वाहतुकीला अचानक शिस्तीत चालवणे प्रशासनाला अवघडच जाणार आहे नागरिकांना शहरातल्या नव्या रस्त्यांचा निटसा उपयोग अजून कळालाच नाही असे म्हणण्याजोगी परिस्थिती आहे रस्ते नव्या धाटणीचे परंतु वापर मात्र जुन्याच गावराणी पध्दतीने सुरु आहेत रस्ता क्रॉस करण्यासाठी वाहतुकीत अचानक घुसणारे पादचारी , टिबलसिट असूनही भर वेगात कटा मारणारे मोटारसायकल चालक,भर वर्दळीत निवांतपणे सरकणारे हातगाडे, सायकलरिक्षा, एका प्रवाशासाठी अचानक कुठेही थांबणारे ऑटोचालक, इतर वाहनधारकांना तुच्छ लेखत भरवाहतुकीत मनमानी करणारे जीप व कारचालक, आपल्या पाठीमागे अनेक वाहनांचे लटांबर घेवून रेंगाळत,अडखळत चालणारी शहर बस, पाच फुटी वाहनावर आडव्या दहा फुट अंतराइतके दुधाचे डबे, इतर अवजड साहित्य लटकवून फिरणारे ग्रामीण वाहनधारक, फेरीवाले, मोकाट जनावरे अन्‌ या सगळयापेक्षाही वरताण करणारे सायकलस्वार अशी चित्रविचित्र सरमिसळ सध्या नांदेडच्या रस्त्यावर दिसून येते ‘जो जिता वही सिंकदर’ अशा थाटात आपले वाहन रेटण्याची अनेक जणांना सवय झाली आहे त्यामुळे अचानक जादुची कांडी फिरल्याप्रमाणे परिस्थितीत बदल करुन घेणे थोडे अवघडच जाईल रस्ता ओलांडण्याच्या पध्दतीपासून सिग्नलच्या उपयोगापर्यंतच्या सर्व नियमांची नांदेडकरांना पुन्हा उजळणी करावी लागणार आहे शिस्तीचा बडगा उगारला की, वाद होणारचमनपाने फेरीवाल्यांच्या नवीन जागा उपलब्धतेचा प्रश्न प्रलंबित ठेवला आहे ज्यांना जागा मिळाल्या त्यांची त्या जागेवर व्यवसाय होत नसल्याची तक्रार आहे तरोडा चौकातल्या भाजीवाल्यांना ज्या जागेत बसवण्यात आले तिथे अरुंद जागेमुळे ग्राहकांची वर्दळ नाही रोज कमाईवर उदरनिर्वाह चालवणाऱ्या या छोटया व्यावसायीकांच्या महत्वाच्या प्रश्नाचा निकाल सर्वात आधी लावणे गरजेचे आहे मनपाच्या पथकावर साठे चौकात झालेली दगडफेक निराश मनोवृत्तीतूनच झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते फेरीवाल्यांचा प्रश्न प्रशासनाला फार काळजीपूर्वक हाताळावा लागणार आहे अतिक्रमणे काढण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांनीही उर्मट वागणुकीऐवजी आपण कुणाचे तरी विश्व उद्‌ध्वस्त करत आहोत ही जाणीव ठेऊन सौहार्द वागणूक देणे आवश्यक आहेवाहतूक समस्येचे सर्व प्रश्न आटोक्यात येईपर्यंत प्रशासनाच्या मोहीमेचे नियोजन व नियंत्रण कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर अवलंबून न ठेवता वरिष्ठस्तराकडून होणे सुध्दा आवश्यक आहे