राहूल गांधी जिंकले, शिवसेना हरली
मुंबई, दि५ काँग्रेसचे युवा नेते खाराहूल गांधी यांनी आपल्या मुंबई दौऱ्यात लोकलमधून प्रवास करीत जनसामान्यांशी संवाद साधला आणि शिवसेनेच्या काळे झेंडे दाखविण्याच्या आंदोलनाचा पार फज्जा उडाला शिवाजी महाराजांनी मोगलांच्या सैन्याला कात्रज घाटात जशी हूल दिली तशी राहूल गांधींनी शिवसैनिकांना मुंबईत दिली शिवसेनेने आंदोलनाचा केलेला गाजावाजा आणि राहूल गांधींना जनसामान्यांनी मुंबई दौऱ्यात दिलेला प्रचंड प्रतिसाद यामुळे राहूल गांधींच्या दौऱ्याबाबत सामान्य माणसांनी ‘राहूल गांधी जिंकले, शिवसेना हरली’ अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली
राहूल गांधींचा मुंबई दौरा यापूर्वीच जाहीर झाला होता तथापि त्यांच्या विधानाचा विपर्यास करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राहूल गांधींना त्यांच्या मुंबई दौऱ्यात काळे झेंडे दाखवावे असा शिवसैनिकांना आदेश दिला राहूल गांधी यांनी त्यास न जुमानता आपला मुंबई दौरा ठरल्याप्रमाणे होईल असे जाहीर केले मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी राहूल गांधींचा अपमान सहन करणार नाही अशी घोषणा करून कायदा हातात घेणाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असे जाहीर केले शिवसेनेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सर्वच ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता
विर्लेपार्ले येथील भाईदास हॉलमध्ये काँग्रेसच्या सदस्य नोंदणीचा शुभारंभ आणि घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगरातील डॉबाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास वंदन असे राहूल गांधींचे कार्यक्रम होते या दोन्ही ठिकाणांना जाणाऱ्या रस्त्यावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता राहूल गांधी यांचे विमानाने मुंबईत आगमन झाले त्यांच्या सोबत अभायुवक काँग्रेसचे अध्यक्ष राजीव सातव हे ही होते विमानतळावरून राहूल गांधी हेलिकॉप्टरने पवन हाऊस मध्ये आले तेथून ते विलेपार्लेच्या भाईदास हॉलमध्ये आले भाईदास हॉलमध्ये राहूल गांधींनी युवा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले युवकांनी राजकारणात सक्रीय भाग घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले देशातील सर्व जाती धर्माच्या लोकांना आणि विविध संस्कृतींना एकत्र आणणारा फक्त काँग्रेस हाच एकमेव पक्ष आहे असेही राहूल गांधींनी सांगितले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना राहूल गांधी म्हणाले की, देशात दोन प्रकारचे नेते असतात एक देश जोडणारे आणि दुसरे देशाला तोडणारे
राहूल गांधी अंधेरीहून हेलिकॉप्टरने घाटकोपरला येणार होते परंतु अचानक त्यांनी आपला बेत बदलला आणि त्यांच्या समवेत असलेला गाड्यांचा ताफा रेल्वे स्टेशनवर आला तिथे अंधेरीहून दादरपर्यंत राहूल गांधींनी लोकलमधून प्रवास केला राहूल गांधींना पाहून लोकांना आनंदाचा धक्का बसला राहूल गांधींनी लोकलमध्ये प्रवाशांशी हितगुज केली बऱ्याच जणांनी विकासाविषयी राहूल गांधींना विनंती केली दादरला आल्यानंतर राहूल गांधी पुन्हा मध्य रेल्वेच्या तिकीट खिडकीपाशी आले आणि त्यांनी रांगेत उभे राहून तिकीट काढले ते ही सेकंड क्लासचे दादरहून घाटकोपरपर्यंत राहूल गांधींचा लोकल प्रवास सुरू झाला राहूल गांधींना पाहून युवकांनी डब्यात एकच गर्दी केली राहूल गांधी झिंदाबाद, देश का नेता कैसा हो, राहूल गांधी जैसा हो अशा घोषणांनी लोकलचा डबा दुमदुमला राहूल गांधींना काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न करणारे शिवसैनिक मात्र हिरमुसले झाले कारण राहूल गांधींनी त्यांना लीलया हूल दिली होती
आता एसटीसुद्धा झाली ऑनलाईन
नांदेड, दि५ (प्रतिनिधी) ऑनलाईन हा सध्या परवलीचा शब्द झाला आहे ऑनलाईन अॅडमिशन, ऑनलाईन परीक्षा, ऑनलाईन बँकींग, ऑनलाईन ट्रेडींग, विमान व रेल्वे प्रवासाचे आरक्षण ऑनलाईन या सर्वात आपली एसटीका बरं मागे राहील? आता एसटीचे तिकीटही ऑनलाईन म्हणजे इंटरनेटद्वारे मिळण्याची सुविधा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने उपलब्ध करून दिली आहे दि८ जानेवारी रोजी या सेवेचा शुभारंभ मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला
संगणकीकरणाचा व्यापक कार्यक्रम मंडळाने हाती घेतला असून २४७ आगारांच्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक तिकीट इश्यू मशिनचा वापर आणि ३२७ बस स्थानकांवर संगणकीय आरक्षण सुविधा पुरविण्याचा यात समावेश आहे हा प्रकल्प बीओटी तत्वावर करण्यात येत असून त्यासाठी मेट्रायमॅक्स आयटी इन्फ्रास्ट्रक्चर अॅण्ड सर्व्हीसेस लिमुंबई यांची निवड महामंडळाने केली आहे
संणकीय आरक्षण सुविधा प्रथम टप्प्यात २७ बसस्थानकांच्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आली आहे याशिवाय ११३ अधिकृत खाजगी बुकींग एजंटद्वारे ही सुविधा मुंबई, नागपूर, पुणे, ठाणे, नाशिक, पंढरपूर, औरंगाबाद या शहरात विस्तारीत करण्यात आली आहे उर्वरित ३०० बसस्थानकांमध्ये संगणकीय आरक्षण येत्या १० महिन्यात टप्प्याटप्प्याने कार्यान्वित करण्यात येणार आहे
प्रवाशांना इंटरनेटद्वारे तिकीट आरक्षण सुविधेसाठी संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली असून एचडीएफसी बँक व इंडीया आडीयाजकॉम लिकंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सध्या २३८३ सेवांसाठी संगणकीय आरक्षण सुविधा उपलब्ध असून यात ८५० लांब पल्ला, १२८३ मध्यम लांब पल्ला व २५० किमीअंतराच्या सेवांचा समावेश आहे २५३ वातानुकूलित, १००० निमआराम, ११३० सर्वसाधारण सेवा प्रकारातील फेऱ्यांसाठी ही आरक्षण सेवा उपलब्ध आहे या योजनेत दादरपुणेदादर, पुणेनाशिकपुणे, औरंगाबादपुणेऔरंगाबाद, बोरीवलीस्वारगेटबोरीवली, औरंगाबादमुंबईऔरंगाबाद, पुणेठाणेपुणे वातानुकुलित शिवनेरील फेऱ्यांचा समावेश आहे पायलट प्रकल्पांतर्गत सध्या मुंबई, ठाणे, पुणे, अमरावती, नागपूर, नाशिक व पंढरपूर या ठिकाणच्या २७ बसस्थानकांवर ही सेवा सुरू करण्यात आली आहे
८ फेब्रुवारीपासून राष्ट्रीय पत्रकारिता कार्यशाळा
नांदेड, दि५ (प्रतिनिधी) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र संकुलाच्या वतीने दि८ व ९ फेब्रुवारी रोजी विद्यापीठात पत्रकारिता काल व आज या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यशाळेचे उद्घाटन माहिती व जनसंपर्क विभागाच्या राज्यमंत्री नाफौजिया खान यांच्या हस्ते होणार आहे
पत्रकारिता या विषयात विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून दि८ फेब्रुवारी रोजी उद्घाटन समारोहाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉएसबीनिमसे हे राहणार आहेत कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आडीपीसावंत, सामाजिक विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉयुडीसावंत हे उपस्थित राहणार आहेत
दि८ रोजी पहिल्या सत्रात महाराष्ट्र वृत्त सेवा मुंबईचे मुख्य संपादक कुमार कदम यांचे तर दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ संपादक टाईम्स वृत्तपत्र समुहाचे संपादकीय सल्लागार खाभारतकुमार राऊत यांचे व्याख्यान होणार आहे
दि९ रोजी सकाळी १० वाजता राजस्थान विद्यापीठातील माध्यमशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉसंजीव भानावत यांचे तर दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ पत्रकार तथा लेखक एसकेकुलकर्णी यांचे व्याख्यान होणार आहे त्यानंतर हासेणाऱ्या समारोप समारंभास प्रमुख अतिथी म्हणून आओमप्रकाश पोकर्णा हे उपस्थित राहणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉसर्जेराव निमसे हे असतील
वरील कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी डॉदीपक शिंदे, डॉकेशव देशमुख, डॉव्हीएनपाटील, डॉसुहास पाठक, प्राराजेंद्र गोणारकर, प्रासचिन नरंगले, प्राअशोक गिनगिने, प्राडॉपृथ्वीराज तौर, प्रामहेश जोशी आदी प्रयत्न करत आहेत
सेन्सेक्सचा तीन महिन्यातील नीचांक
मुंबई, दि५ गुंतवणूकदारांनी खरेदीचा प्रचंड सपाटा लावल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक शुक्रवारी तब्बल ४३० अंकांनी कोसळला तीन महिन्यानंतर निर्देशांक १६ हजार अंकाच्या खाली गेला आहे दिवसा अखेर निर्देशांक १५७९०९३ अंकावर बंद झाला
मागील तीन महिन्यातील हा निच्चांक आहे गुरूवारीही निर्देशांकाने २७१ अंकांची आपटी खाल्ली होती आंतरराष्ट्रीय मंदीमुळे आशियातील बहुतेक शेअर बाजार सलगपणे कोसळत असल्याचे दिसून आले राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) १२६७० अंकांनी घसरून ४७१८६५ अंकावर बंद झाला
महाराष्ट्रात ३०९७ किमीलांबीच्या महामार्गाची कामे सुरू भुजबळ
मुंबई, दि५ राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रमाच्या विविध प्रकल्पांतर्गत राज्यात २९ हजार कोटी रूपये खर्चाचे आणि सुमारे ३०९७ किमीलांबीच्या महामार्गाची कामे सुरू आहेत हे सर्व मार्ग चार आणि सहा पदरी महामार्ग आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिली
राष्ट्रीय रस्ते विकास कार्यक्रमाच्या चौथ्या टप्प्यात अमरावती, धुळे, गुजरात सीमा, खेडनाशिक, नागपूरमध्यप्रदेश सीमा, धुळेऔरंगाबाद, यडशी उस्मानाबाद सोलापूर, सोलापूरआंध्रप्रदेश सीमा या महाराष्ट्र राज्याने प्रस्तावित केलेल्या रस्त्यांचा विचार रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग विभागाने केल्याबद्दल भुजबळ यांनी केंद्राचे आभार मानले
असंघटित कामगारांच्या हितास प्राधान्य-मुख्यमंत्री
मुंबई ,दि ५ कामगारांचे प्रश्न सोडवितांना असंघटित व असंरक्षित क्षेत्रातील कामगारांच्या हितास प्राधान्य देण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी वाशी येथील विष्णुदास भावे सभागृहात आयोजित कामगार मेळाव्यात बोलतांना दिली
अखिल भारतीय माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वाशी येथील फळ व भाजीपाला मार्केटमधील इमारतीतील स्वर्गीय शंकरराव चव्हाण सभागृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते झाले सहकार व पणनमंत्री हर्षवर्धन पाटील, राज्याचे कामगार राज्यमंत्री पद्माकर वळवी, आप्रशांत ठाकूर, विवेक पंडीत, माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी आमदार विजय सावंत, उदयसिंह देशमुख उर्फ भय्यूजी महाराज आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते
कामगारांना ३ हजाराच्यावर पगार असेल तर धनादेशाने देण्याचा निर्णय शासनाने नुकताच घेतला असून तो कामगार क्षेत्रास बंधनकारक आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, बोनसची रक्कमही धनादेशाने देण्यात येणार आहे कामगारांच्या घरांच्या प्रश्नांना शासनाने प्राधान्य दिले असून घरकूलाचाही प्रश्न लवकरच सुटेल तसेच प्रत्येक कामगारास स्मार्ट कार्ड देण्यात येईल शेतमजूर व ऊसतोड कामगारांना वृद्धापकळात सुरक्षित जीवन जगता यावे यासाठी पेन्शन योजना सुरू करण्याचा विचार शासन करीत आहे
राज्यात ४५ कोटी संघटित तर ४ कोटी असंघटभत कामगार आहेत या कामगारांची पिळवणूक होऊ नये म्हणून त्यांना संरक्षण तसेच त्यांच्या कष्टाला प्रतिष्ठा देण्यास शासन प्राधान्य देईल नवी मुंबई परिसरात शहरीकरण, नागरीकरण, औद्योगिकरणामुळे लोकसंख्येत वाढ होत आहे प्रत्येक नागरिकांस सुरक्षित जीवन जगता यावे यासाठी पेन्शन योजना सुरू करण्याचा विचार शासन करीत आहे
या राज्यात साडेचार कोटी संघटीत तर चार कोठी असंघटीत कामगार आहेत या कामगारांची पिळवणूक होऊ नये, त्यांना संरक्षण तसेच त्यांच्या कष्टाला प्रतिष्ठा देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे प्रत्येक नागरीकाला सुरक्षित जीवनाची हमी मिळावी यासाठी गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढली जातील असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला यावेळी बोलतांना सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, सहकार व पणन विभागाचे राज्यात उत्कृष्ट काम आहे २९५ कृषी उत्पन्न बाजार समित्यातून मागील वर्षात ४२ हजार कोटी रूपयांच्या शेतमालाची उलाढाल झाली यावर्षी ही उलाढाल १ लाख कोटी पर्यंत वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्र हे कृषी व औद्योगिक क्रांतीचे प्रथम क्रमांकाचे राज्य व्हावे यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची गरज आहे
कामगार राज्यमंत्री वळवी यांनी कामगारांसाठी असलेल्या शासकीय योजनांची माहिती दिली असंघटीत कामगारांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत शासन प्रयत्नशील आहे असे ते म्हणाले प्रारंभी कामगारनेते बाबुराव रामिष्टे यांनी अखिल भारतीय माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या कामाची माहिती देऊन कामगारांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली